भारताचे नवे 'ब्रह्मास्त्र'...  हवेतून जमिनीवर होणार मारा...  'रुद्रम-२' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३ जून - भारताने संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरते'कडे आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय हवाई दलाने (IAF) संयुक्तपणे, हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या 'रुद्रम-२' (RudraM-II) या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची सुखोई (Su-30 MKI) लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतली आहे. ओडिशाच्या चांदीपूर किनारपट्टीवर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ही चाचणी पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढली असून शत्रूचे रडार आणि संरक्षण यंत्रणा नष्ट करणे आता भारताला अधिक सोपे होणार आहे.

१०० टक्के उद्दिष्ट साध्य, शत्रूचा तळ अचूक टिपला!
हवाई दलाच्या लढाऊ विमानाने उड्डाण केल्यानंतर हे क्षेपणास्त्र हवेत सोडण्यात आले. क्षेपणास्त्राने पूर्वनिश्चित मार्ग पूर्ण करत शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. चांदीपूर येथील एकात्मिक टेस्ट रेंजच्या (ITR) रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि टेलिमेट्री यंत्रणांनी केलेल्या नोंदीनुसार, या चाचणीची सर्व उद्दिष्टे १०० टक्के यशस्वीरीत्या साध्य झाली आहेत. या चाचणीमुळे क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींची (Sub-systems) क्षमता आणि ताकद सिद्ध झाली आहे.

Advertisement

संपूर्ण 'स्वदेशी' तंत्रज्ञान
'रुद्रम-२' हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. हैदराबादच्या 'इमरात संशोधन केंद्राने' (RCI) डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे विकसित केले आहे. यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सह अनेक भारतीय संरक्षण उद्योगांनी मोलाचे योगदान दिले आहे.

'आत्मनिर्भर भारत' अभियानाला मोठे बळ: राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल डीआरडीओ, हवाई दल आणि संबंधित उद्योग क्षेत्राचे कौतुक केले आहे. "या यशस्वी चाचणीमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची प्रगती सिद्ध झाली असून प्रगत शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला मोठे बळ मिळाले आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच डीआरडीओच्या अध्यक्षांनीही या कामगिरीबद्दल संपूर्ण शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

?s=20

Comments

No comments yet.