IPL चा अर्धा हंगाम संपला... आता समीकरणं बदलणार... जाणून घ्या कोणत्या संघाला प्ले-ऑफसाठी किती संघर्ष करावा लागणार?

Share:
Main Image
Last updated: 27-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - टाटा आयपीएलचा (IPL) यंदाचा हंगाम अर्ध्याहून अधिक टप्प्यावर येऊन पोहोचला असून गुणतालिकेतील (Points Table) गणिते आता अधिक रंजक झाली आहेत. ३८ सामन्यांच्या समाप्तीनंतर पंजाब किंग्ज (PBKS) १३ गुणांसह अव्वल स्थानी असून त्यांनी प्ले-ऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

पंजाब किंग्जची 'किंग' स्टाईल कामगिरी

पंजाब किंग्जने ७ सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय मिळवत आणि १ सामना अनिर्णित राहिल्याने एकूण १३ गुणांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा नेट रनरेट (+1.333) हा इतर सर्व संघांच्या तुलनेत सरस आहे. दुसऱ्या क्रमांकावर आरसीबी (RCB) असून ७ सामन्यांत ५ विजयांसह त्यांचे १० गुण आहेत.

Advertisement

मधल्या फळीत काटाजोड स्पर्धा

गुणतालिकेत दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकापर्यंत गुणांची समान पातळी पाहायला मिळत आहे. आरसीबी, हैदराबाद आणि राजस्थान या तिन्ही संघांचे प्रत्येकी १० गुण आहेत. मात्र, सरस रनरेटमुळे आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स ८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून त्यांना आपली जागा टिकवण्यासाठी आगामी सामन्यांत विजय अनिवार्य आहे.

गुणतालिकेची सद्यस्थिती एका नजरेत:

Comments

No comments yet.