चौकसभांमध्ये एकच नारा, ऐश्वर्या लाड-जेजूरकर यांना निवडून आणा... प्रभाग २ मध्ये ‘एकच ध्यास, शाश्वत विकास’चा नारा... 

Share:
Main Image
Last updated: 11-Jan-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. ११ जानेवारी २०२६ -  नाशिक महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने पंचवटी परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या लाड-जेजूरकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांच्या चौकसभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. "ऐश्वर्या ताईंना निवडून आणा," अशा घोषणांनी सध्या आडगाव आणि परिसर दुमदुमून गेला आहे.

आडगाव आणि नववसाहतींमध्ये जोरदार स्वागत

प्रभाग २ मधील ग्रामीण धाटणीचा आडगाव परिसर आणि वेगाने विस्तारणाऱ्या नववसाहतींमध्ये ऐश्वर्या लाड-जेजूरकर यांनी पदयात्रा आणि चौकसभांचा धडाका लावला आहे. महिला भगिनींकडून त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले जात आहे, तर ज्येष्ठ नागरिक आपल्या भागातील प्रश्नांवर त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या जनसंपर्क मोहिमेचे रूपांतर आता मोठ्या शक्तीप्रदर्शनात होताना दिसत आहे.

विकासाचा ठाम संकल्प

प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना ऐश्वर्या लाड-जेजूरकर यांनी आपल्या विकासकामांची शिदोरी आणि भविष्यातील व्हिजन मांडले. "प्रभागाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि जनसेवेची बांधिलकी हीच माझी प्राथमिकता आहे. सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून प्रभाग २ ला मॉडेल प्रभाग बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

 

महिला आणि तरुणांची मोठी फळी

भाजपच्या या तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी महिला आणि तरुण मतदारांची मोठी फळी उभी राहिली आहे. 'एकच ध्यास, शाश्वत विकास' हा मंत्र घेऊन त्या घरोघरी पोहोचत आहेत. विशेषतः आडगाव परिसरातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गातून त्यांना मिळणारा पाठिंबा विरोधकांच्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे.

प्रभागातील मुख्य मुद्दे:

प्रभागातील वाढता जनसमर्थन पाहता, 'आपली ताई, ऐश्वर्या ताई' हा नारा सध्या मतदारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या निवडणुकीत प्रभाग २ मधून कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, ऐश्वर्या लाड-जेजूरकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

 

Comments

No comments yet.